Side Effects of Mobile Phones in Marathi : आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल (Mobile Used) आहे. आपला जास्तीतच जास्त वेळ हा मोबाईलमध्ये जातो. लोक त्यांचा वापर कुणाशी तरी बोलणे, जेवणाची ऑर्डर, वस्तूंची ऑर्डर आणि महत्त्वाचे म्हणेज सोशल मिडिया यांसारख्या गोष्टींसाठी मोबाईलचा वापर करत असतो. अन्न, कपडे आणि घर यांच्याप्रमाणे मोबाईल ही गरज आजची गरज झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्यासोबत असतो. पण याच मोबाईलचा अतिवापक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल किती वापरायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही का आणि कशासाठी वापरता यावर त्याचे महत्त्व अवलंबून असते. खरं तर, मोबाईल उपकरणांमधून धोकादायक रेडिएशन बाहेर पडतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. एका अहवालानुसार, 0.60 वॅट्स/किलोग्रामपेक्षा जास्त रेडिएशन मानवी शरीरासाठी धोकादायक आहे. परंतु मोबाइलमधून बाहेर पडणारे रेडिएशन दुप्पट आहे. रेडिएशनचे परिणाम इतके गंभीर आहेत की, लोकांमध्ये कर्करोगासारखे आजार वाढत आहेत, याशिवाय गर्भधारणेचे प्रमाण कमी होत आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालानुसार, मोबाईलचा जास्त वापर केल्याने मेंदूचे स्नायू कमकुवत होतात. 


मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत मुंबईत एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात सहभागी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जे लोक दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरतात, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. मोबाइलमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी हे उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


मोबाईलचा अतिवापरामुळे 'या' आजारांचा धोका


डोळ्यांवर गंभीर परिणाम : मोबाईलच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांवर दाब पडतो. कधीकधी तुम्हाला ते जाणवत नाही, परंतु ते तुमच्या डोळ्यांनाही हानी पोहोचवू शकते. तुमचे डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो.


मनगटात वेदना : फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्न आणि वेदना होऊ शकतात. यामुळे मनगटात मुंग्या येणे देखील होऊ शकतात, ज्यामुळे पुढे कार्पल टनेल आणि सेल्फी मनगट होऊ शकतात.


झोपेचा त्रास : झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचे तास कमी होतात. यामुळे सकाळी फ्रेश वाटत नाही आणि दिवसभर झोप येते. मोबाईलच्या अतिवापरामुळे कधी कधी निद्रानाश होतो.


तणाव वाढू शकतो: तणाव सामान्य आहे परंतु जेव्हा सेल फोनवर ताण येतो तेव्हा इंटरनेटवर काहीतरी वाचणे, फोन बराच वेळ वापरणे, पुरेशी झोप न घेणे अशा अनेक कारणांमुळे गंभीर आजार होऊ शकतो.


कर्करोग: जे लोक मोबाईलवर जास्त वेळ बोलतात, त्यांना मेंदूच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. मोबाईल कानाजवळ ठेऊन बोलत असताना त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ऊतींद्वारे शोषले जातात. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.


बहिरेपणा: जास्त वेळ मोबाईलवर बोलल्याने तुमची ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे तुम्ही बहिरे होऊ शकता. किंबहुना मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी कानाच्या नाजूक उतींचे नुकसान होते. म्हणूनच जास्तीत जास्त परिणाम कानाच्या आतील भागावर होतो.


एकाग्रतेचा अभाव : लोकांच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे वाईट परिणाम होतात जर ते मोबाईलवर जास्त बोलतात आणि त्यांची एकाग्रता कमी होऊ लागते. जे लोक मोबाईल फोनवर जास्त वेळ बोलतात ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांची कार्यक्षमता ढासळते.


मोबाईल रेडिएशन कसे टाळावे?


जर तुम्ही फोन जास्त वापरत असाल तर कमी वापरा. याशिवाय फोनमधून रेडिएशन बाहेर पडू नये म्हणून हेडफोनचा वापर करावा. याशिवाय फोन खरेदी करताना त्याची SAR व्हॅल्यू तपासा. 


 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)