नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सतत सीमेवर गोळीबार होत आहे. एलओसीवर दहशतवाद्यांना घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तान सतत गोळीबार करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान मेंढर, कोटली भागात असलेल्या लॉन्चिंग पॅडकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी प्रयत्न करत आहे. 


भिम्बरगली भागात जवळपास 77 दहशतवादी असल्याची माहिती आहे. मेंढर सेक्टरमध्ये 42 दहशतवादी आहेत. तर नौशेरा सेक्टरमध्ये देखील 30 ते 40 दहशतवादी असल्याची माहिती आहे. ज्यांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन ऑलआउटमुळे पाकिस्तानचा तीळ पापड झालाय. आयएसआय आणि पाकिस्तानची आर्मी नवी स्पेशल ऑपरेशन टीम भारतीय जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.


राजौरी जिल्ह्यात भिंबर गली सेक्टरमध्ये पाकड्यांनी फायरिंग केली. ज्यामध्ये रायफलमॅन रामअवतार, शुभम सिंह आणि हवलदार रोशन लाल शहीद झाले आहेत.