मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६२ वा  महापरिनिर्वाण दिन. यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक दादर येथील शिवाजी पार्क इथं दाखल झाले आहेत. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती* आणि तालविहारच्या संयुक्त विद्यमाने सलग तृतीय वर्षी जगप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित भवांनी शंकर, उस्ताद दिलशाद खान, पंडित अतुल कुमार उपाध्ये, पंडित मुकेश जाधव  जगप्रसिद्ध सितार वादक इटावा घराण्याचे उस्ताद शाहिद परवेज खान, फ्ल्यूट सिस्टर सुचिस्मिता आणि डेबूप्रिया चटर्जी, व्हायोलीन वादक पंडित प्रभाकर धाकडे, या जगप्रसिद्ध  शास्त्रीय संगिताकाराच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे.


बाबासाहेबांना आदरांजली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पखवाज वादक भवानी शंकर, उस्ताद दिलशाद खान, पंडित अतुल कुमार उपाध्ये, पंडित मुकेश जाधव, सतार वादक शाहीद परवेज आणि फ्लुट सिस्टर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सुचिस्मिता आणि देबूप्रिया चॅटर्जी असे दिग्गज कलाकार इथे आपल्या संगीतातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणार आहेत. 


देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर येत महामानवाला अभिवादन करण्यासाठी म्हणून बुधवारी मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी चैत्यभूमीपाशी दाखल झाले.


समाजातील अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्लक्षित  वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या वाटेत अमूल्य योगदान देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या मूलमंत्राबद्दल सारा देश त्यांचा ऋणी आहे.


सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या याच महामानवाला आज देशभरातून मानवंदना देण्यात येत आहे.


प्रशासनाच सहकार्य 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिविर्वाण दिनानिमित्त सोमवारपासूनच राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतील भीमसैनिकांनी शिवाजी पार्क येथे येण्यास सुरुवात केली.


दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनुयायांची होणारी गर्दी आणि एकंदर सर्व परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून या साऱ्यामध्ये महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य करण्याच आलं आहे. 


भीमसैनिकांसाठी शिवाजी पार्क येथे जवळपास एक लाख चौरस फुटांचा मंडप बांधण्यात आला आहे. त्यासोबतच अनुयायांना मैदानात राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे.


पालिकेतर्फे शक्य ते सर्व सहकार्य करण्यात आलं असून भीमसैनिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं.


पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थांमध्ये जर कोणत्या त्रुटी आढळल्या तर त्याची माहिती अनुयायांनी द्यावी, त्यावर त्वरित लक्ष पुरवण्यात येईल, असंही ते म्हणाले.