उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पतीचं निधन झाल्याचा मानसिक धक्का महिलेला सहन झाला नाही. पतीचा मृत्यू झाल्याच्या दु:खात तिने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरु असून, हळहळ व्यक्त होत आहे.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाजियाबादच्या कौशंबी पोलीस ठाणे क्षेत्रात ही दुर्देवी घटना घडली आहे. वैशाली चौकी सेक्टर 3 च्या एलकॉन अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर राहणाऱ्या नवविवाहिताने पतीला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर आत्महत्या केली. तिने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवलं. यामुळे घरातून एकाच वेळी दोन मृतदेह निघाले आणि लोकांचे डोळे पाणावले. 


पतीला हार्ट अटॅक आल्याने पत्नीने संपवलं जीवन


मिळालेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरला या जोडप्याचं लग्न झालं होतं. सोमवारी दोघेही दिल्लीमधील बागेत फिरायला गेले होते. यावेळी अचानक पतीच्या छातीत वेदना सुरु झाल्या होत्या. यानंतर महिलेने तात्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली. 


कुटुंबीय तात्काळ त्याला घेऊन रुग्णालयात गेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचताच त्याला मृत घोषित केलं. रात्री उशिरा पतीचा मृतदेह घरी पोहोचला. दरम्यान पतीचा मृत्यू झाल्याने महिलेला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे पतीचा मृत्यू घरी येताच पत्नीने थेट सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. जखमी अवस्थेत पत्नीला मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तेथून तिला दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात रेफर करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान तिचं निधन झालं. 


3 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न


मृत अंजलीचं वय 22 वर्षं होतं. तर तिचा पती अभिषेक आहुवालियाचं वय 25 वर्षं होतं. अभिषेक प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करत होता. गाजिबायाबदच्या वैशाली परिसरात राहणाऱ्या अभिषेकचं नोव्हेंबरला दिल्लीच्या करावल येथील अंजलीशी लग्न झालं होतं.