Crime News : नवरा बायको म्हटलं की वाद (husband wife Argument) आलाच...कोणाच्या घरात भांडणं होत नाहीत, असं वाक्य सर्रास ऐकायला मिळतं. नवरा बायकोमध्ये शाब्दिक बाचाबाची होतच राहते. मात्र, कधीकधी भांडण एवढी वाढतात की भलतंय काहीतरी होऊन बसतं. असाच एक प्रकार राजस्थानातून (Rajastan Crime News) समोर आला आहे. कारण काय तर मिस कॉल... (Argument between  husband and wife due to Miss Call)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांसवाडा जिल्ह्यातील दानपूर पोलीस स्टेशन परिसरात (Police Station) धक्कादायक घटना घडली. रात्री पती-पत्नीमध्ये वाद पेटला. वाद टोकाला गेला. नवऱ्याचं बोलणं एवढं मनावर घेतलं की... तिने तिचं आयुष्य संपवलं. पत्नीने विषारी पाणी पिलं अन् तिचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेत पत्नीला नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 


महिलेला महात्मा गांधी रुग्णालयात (Hospital) आणलं, तेथं उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. शनिवारी पोलिसांनी मेडिकल बोर्डाकडून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं. ही संपूर्ण घटना रात्री घडली, रेखा पती संतोषसोबत घरी असताना पतीच्या मोबाईलवर मिस कॉल (Miss Call) आला. त्यावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं.  बायको सतत भांडण करत असायची असा आरोप देखील नवऱ्याने केला आहे.


आणखी वाचा- प्रेम म्हणजे प्रेम असतं! शिक्षिकेचा विद्यार्थिनीवर जडला जीव, यासाठी तीने उचललं असं पाऊल


दरम्यान, दोघांच्या लग्नाला 3 वर्षे झाली आहेत. तसेच त्यांना 12 महिन्यांचा मुलगा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. त्यानंतर आता पोलिस विविध अॅगलने प्रकरणाचा तपास करत आहेत.