रांची : साखरपुडा झाला त्यानंतर वाढदिवस साजरा झाला मात्र वाढदिवसानंतरचा पुढचा दिवस एवढा वाईट ठरेल याची कल्पना कोणाला नव्हती. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच सख्ख्या बहिणींचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता प्रश्न असा आहे की या सख्ख्या बहिणींनी आपलं आयुष्य संपवलं की त्यांची हत्या झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. यातील एका बहिणीचा साखरपुडा झाला होता. लग्न तोंडावर आलं होतं. मात्र त्याआधीच सख्ख्या बहिणींच्या या संशयास्पद सापडलेल्या मृतदेहानं खळबळ उडाली. 


ही धक्कादायक घटना झारखंडच्या रांची परिसरात घडली आहे. या दोन बहिणींनी विष प्राशन करून आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रांचीतील एका रुग्णालयात मोठी बहीण नोकरी करत होती. तर दुसरी लहान बहीण ही 9 वीमध्ये शकत होती. मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. यांचे वडील संजय लखानी हे रांचीच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक आहेत. 


संजय लखानी यांच्या मोठ्या मुलीचा शीतलचा वाढदिवस होता. सर्वजण वाढदिवस साजरा करून आपापल्या खोलीत झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीत शीतल आणि तिच्या लहान बहिणीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलिसांनी या मृत तरुणीची खोली सील केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.