पटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. वैशाली जिल्ह्यातल्या चकसिकंदरमध्ये मोदींच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. आरजेडी कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


एका कार्यक्रमासाठी सुशील मोदी जंदाहा येथे जात होते. तेव्हा चकसिकंदरजवळ त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरामध्ये थोडावेळ तणावाचं वातावरण होतं. या घटनेनंतर सुशील मोदी यांनी ट्विट करून भाजप कार्यकर्त्यांना शांत राहायचं आवाहन केलं आहे. तसंच आरजेडीचे कार्यकर्ते हताश आहेत म्हणून हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचं सुशील मोदी या ट्विटमधये म्हणाले आहेत.