लखनऊ : प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती सवय असते. काही सवयी वाईट असतात तर काही चांगल्या सवयी देखील माणसाला असतात. अशीच एक वाईट सवय एका माणसाला इतकी महागात पडली की, त्याच्या होणाऱ्या बायको लग्न मंडपात लग्न मोडलं आणि त्याला निराश होऊन घरी परतावे लागले. इथे लग्न करायला आधी मुली मिळत नाही आणि याने जी मिळाली तिलाही आपल्या सवीयीमुळे गमावले.


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील ही घटना आहे. येथील मिश्रौली गावाच्या एका मुलीचे लग्न खेजुरी गावाच्या मुलासोबत जमले. परंतु जेव्हा लग्नाची वरात घेऊन नवरदेव नवरीच्या दारात आला, तेव्हा नवरीने त्याला गुटखा तोंडात चघळताना पाहिले. त्यानंतर तिने त्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला.


नवरीचा नकार ऐकल्यानंतर नवरदेवाला धक्काच बसला. त्याच्या गुटखा खाण्याच्या सवयामुळे त्याचे लग्न मोडेल असा त्याने स्वप्नात सुद्धा विचार केला नसावा.


गुटखा खाण्याच्या सवयीमुळे माझं लग्न मोडत आहे ही गोष्ट नवरदेवाला समजल्यावर तो, त्या नवरीकडे गेला आणि तिची माफी मागून तिला विनवनी करु लागला. परंतू नवरीने त्याचे एक ऐकले नाही. तिने तिच्या घरच्यांनाही तिला हे लग्न मान्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर त्यांचे लग्न मोडले.


लग्न मोडल्यानंतर दोन्हा कुटूंबीयांनी घेतलेल्या वस्तू आणि पैसे एकमेकांना परत केले. त्यानंतर वरातीला मुलीला न घेताच आल्या पावली घरी परतावे लागले.