मुंबई : तेलगू देसम पार्टीची महत्वाची बैठक आज पार पडली, सत्ताधारी एनडीएमध्ये राहायचं किंवा नाही यावर ही महत्वाची बैठक होती. या बैठकीत आज एनडीएमध्ये टीडीपीने राहायचं किंवा नाही यावर स्पष्टपणे कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.


पुढील २ ते ३ दिवसात निर्णय शक्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र पुढील दोन ते तीन दिवसात यावर निर्णय घेतला जाईल, असं तेलगू देसमच्या नेत्यांनी म्हटलं आहे. विजयवाडा येथे ही बैठक कोणताही महत्वाचा निर्णय न होताच पार पडली आहे.


चंद्राबाबू नायडू भाजपवर नाराज


भाजपकडून विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने नायडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. 


एनडीएमधून बाहेर पडण्याचा इशारा


तसंच एनडीएमधून बाहेर पडण्याचा इशारा नायडू यांनी दिला होता.  अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी तरतूद केली नसल्याने नायडूंच्या नाराजीत आणखी भर पडली.


उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा


याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजतंय.