न्यायमूर्ती उदय उमेश ललित (CJI UU  Lalit) यांनी नुकतीच भारताच्या सरन्यायाधीशपदाची (chief justice of india) सूत्रे हाती घेतली आहेत. उदय ललित हे सरन्यायाधीश झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अवघ्या चार दिवसांत 1800 हून अधिक खटले निकाली काढले आहेत. 27 ऑगस्ट रोजी 49वे सरन्यायाधीय म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी शपथ घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात सरन्यायाधीश यूयू ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या कामगिरीची माहिती दिली. सरन्यायाधीश ललित म्हणाले की, गेल्या चार दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने एकूण 1293 विविध प्रकरणे, 106 नियमित प्रकरणे आणि 440 हस्तांतरण याचिका निकाली काढल्या आहेत.


वकिलांना उद्देशून ते म्हणाले, “गेल्या चार दिवसांत घडलेली एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी जी प्रकरणे आम्ही सूचीबद्ध करत आहोत त्यापेक्षा जास्त आहेत. माझ्या सरचिटणीसांनी माझ्यासमोर आकडे ठेवले आहेत. गेल्या चार दिवसांत न्यायालयाने निकाली काढलेल्या प्रकरणांची एकूण संख्या 1293 होती," असे सरन्यायाधीश ललित म्हणाले.


द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, 1293 प्रकरणांपैकी 493 प्रकरणे 29 ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणून यूयू ललित यांचा हा पहिला दिवस होता. यानंतर शुक्रवारी 315 निकाल सुनावण्यात आले. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आणि गुरुवारी अनुक्रमे 197 आणि 228 प्रकरणे निकाली काढली. गणेश चतुर्थीनिमित्त बुधवारी सर्वोच्च न्यायालय बंद होते.
आपल्या भाषणादरम्यान न्यायमूर्ती यूयू ललित यांनी जोर दिला की सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीच्या 106 प्रकरणांचा दोन दिवसांत निर्णय घेऊ शकते. तीन न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर नियमित सुनावणीच्या प्रकरणांमध्ये एकतर विस्तृत युक्तिवाद आवश्यक आहेत किंवा सूचीबद्ध न करता अनेक दशकांपासून स्थगित आहेत.


न्यायालयाने सोमवारपासून 440 हस्तांतरण याचिकाही निकाली काढल्या. मंगळवार आणि गुरुवारी मोठ्या प्रमाणात हस्तांतरण याचिकांवर निकाल देण्यात आला. न्यायमूर्ती ललित म्हणाले की सर्वोच्च न्यायालय शक्य तितक्या खटल्यांचा निकाल देण्याचा प्रयत्न करेल आणि सरन्यायाधीश म्हणून 74 दिवसांच्या आपल्या अल्प कार्यकाळात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु