मुंबई :  कोरोना विषाणूंविरुद्धच्या (coronavirus) लढाईत सरकारने एक 'Easy To Follow' सल्ला जारी केला आहे, ज्यात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे Aerosols हवेत 10 मीटर पर्यंत तरंगू शकतात. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी गुरुवारी सांगितले की कोविड-19पासून पीडित व्यक्तीच्या शिंकातून सोडले जाणारे थेंब दोन मीटरच्या आत पडून त्यातून बाहेर पडणारे एरोसोल 10 मीटरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे आता सहा नाही तर 10 मीटरपर्यंत धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाने आपल्या 'Easy To Follow' हा सल्ला देताना म्हटले आहे की, SARS-CoV-2 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संसर्ग थांबविण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. तरच हा साथीचा रोग आटोक्यात राहील. मास्क घाला, सोशल डिस्टन पाळा, स्वच्छता राखा आणि खुली तसेच हवेशीर जागेचा वापर करा


कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे करा


- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यात खुली हवेशीर जागा महत्वाची भूमिका बजावू शकते. एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या मोकळ्या जागेत हा संसर्ग पसरण्याचा धोकाही कमी असतो.


- 'लाळ आणि शिंकणे आणि संसर्गित थेंब हे विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जाऊ शकतात. मोठे थेंब जमिनीवर पडतात आणि पृष्ठभागावर पडतात आणि लहान थेंब हवेमध्ये बरेच अंतर जाऊ शकतात. ' ते 10 मीटर पर्यंत परसरतात. त्यामुळे धोका असतो.


- जे ठिकाण बंद आहे आणि ज्या ठिकाणी हवा खेळती राहत नाही तेथे संक्रमित थेंब एकाग्र होतात आणि यामुळे त्या भागातील लोकांमध्ये संक्रमणाचा धोका वाढतो.


- संक्रमित व्यक्तीच्या नाकातून बाहेर पडणारे थेंब दोन मीटरच्या क्षेत्रात पडू शकतात आणि अधिक लहान थेंब हवेतून दहा मीटरपर्यंत जाऊ शकतात. 


आधीच्या प्रोटोकॉलनुसार संक्रमण रोखण्यासाठी सहा फूट अंतर आवश्यक असल्याचे सांगितले जात होते. बर्‍याच जणांनी सोशल मीडियावर असे म्हटले आहे की, कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येताही त्यांना संसर्ग झाला.अशा परिस्थितीत आता असे सांगतात की, जागा हवेशीर अल्यास संसर्ग रोखता येतो.


- ज्याप्रमाणे घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडणे आणि एक्झॉस्ट फॅन चालविण्यामुळे हवेतील वास कमी होतो, त्याचप्रकारे हवेशीर ठिकाणी व्हायरसची संख्या कमी होऊ शकते आणि यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.


प्रधान वैज्ञानिक सल्लागारांनी जारी केलेल्या सल्लागारात असे म्हटले आहे की फक्त पंखे, उघड्या दारे आणि खिडक्या उघड्या ठेवल्याने हवा खेळती राहते आणि हवेची गुणपत्ता सुधार शकते. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी असतो.