मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 84 हजार 332 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 लाख 21 हजार 311 रूग्णांना डिसचार्ज मिळाला असून 4 हजार 2  रूग्णांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 



देशात एकून कोरोना रूग्णांची संख्या 2,93,59,155 इतकी आहे. तर आतापर्यंत 3,67,081  कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 10,80,690  इतकी आहे. भारतात आतापर्यंत 24,96,00,304 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.