नवी दिल्ली : काँग्रेसच्या नवी दिल्लीतील वॉर रूममधील समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. संघटना पातळीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे आशिष कुलकर्णी यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वॉर रूमची जबाबदारी सांभाळली. 


रणदीप सुरजेवाला आणि मधुसुदन मिस्त्री यांच्यासह आशिष कुलकर्णी यांच्यावर मतदारसंघनिहाय मोर्चेबांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळं काँग्रेस पक्ष संघटनेला हादरा बसलाय.