मुंबई : उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका दिराने त्याच्या वहिनीला जंगलात गाठले आणि तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा वहिनीने संबंध ठेवण्यासाठी नकार दिला, तेव्हा त्याने तिला मारण्याचा प्लान आखला आणि तिला संपवलं देखील. वहिनीला मारल्यानंतर या दिराने वहिनीशी शारीरीक संबंध ठेवले आणि नंतर तिच्या अंगावर पाणी टाकलं, जेणे करुन त्याच्या हाताचे ठस्से तिच्या अंगावर सापडायला नको. एवढंच काय तर त्याने या शरीरावर माती टाकली आणि तेथून निघूल गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिराने पूर्ण प्रयत्न केला होता की, ज्यामुळे तो या प्रकरणात अडकणार नाही, परंतु असे असले तरी देखील अखेर पोलिसांनी आरोपीला शोधून काढलंच.


ते म्हणतात ना, माणसाच्या कर्माचं फळ त्याला याच जन्मात मिळणार... तसंच या आरोपीसोबत घडलं, त्याने आपल्या डोक्याचा 100 टक्के वापर केला, तरी देखील एका छोट्या गोष्टीमुळे तो पकडला गेलाच.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जुलै रोजी एक महिला सकाळी 8 वाजता शेतात चारा आणण्यासाठी गेली होती, मात्र सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिची सासू तिला शोधण्यासाठी बाहेर पडली. गावातील लोकांनी मिळून शोध घेतला असता शेतात, त्या महिलेचं शरीर अर्धनग्न अवस्थेत आढळून आलं.


नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला होता. तपासात तीन जण निर्दोष आढळले, तर या महिलेचा दीर या घटनेत सहभागी असल्याचे आढळून आले.


खरंतर हा दीर गडबडीत आपला फोन वहिनीच्या मृत शरीराजवळ विसरुन गेला, ज्यामध्ये पोलिसांना आरोपीचे तसेच या वहिनीचे फोटो देखील सापडले, ज्यानंतर पोलिसांनी आरोपील अटक केली.


पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, मृतक त्याची चुलत वहिनी आहे. त्याचा चुलत भाऊ हरिद्वारमध्ये कामाला होता. ज्यामुळे त्याची वहिनी घरात एकटीच राहायची, ज्यामुळे दीडवर्षापासून त्यांचे अनैतिक संबंध होते. परंतु गेल्या काही दिवसापासून त्याचे त्याच्या वहिनीसोबत भांडण झाले होत, ज्यामुळे ती या दीराला आपल्यापासून लांब करत होती.


एके दिवशी दीराच्या मित्रांनी देखील त्याच्या वहिनीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यानंतर या दीराने रागाच्या भरात वहिनीला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्लान आखला आणि त्यांनी तिला शेतात जातान रस्त्यात आडवले, ज्यानंतर ही सगळी घटना घडली असल्याचे दीराने कबुल केले.


यानंतर चौकशीत आरोपीने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. सध्या पोलिसांनी चार आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.