नागपूर : प्रेम हे आंधळं असतं, ते कधी कोणासोबत कधी होईल याबद्दल कोणालाच काही ठाऊक नसते. प्रेम ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात जीवन जगण्याची नवीन आशा येते. तर काही वेळा प्रेमात माणसाचा नाश देखील होतो. प्रेमात माणूस इतका आंधळा होतो की, त्यांना काय चूक काय बरोबर हे कळत नाही. ज्यामुळे बऱ्याचदा लोकं चुकिचं पाऊल उचलतात. अशीच काहीशी घटना नागपूरात घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येथे एका विवाहित महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम झालं, ज्यामुळे तिने आपल्या सुखी संसाराचा विनाश केला आहे. आपल्या बॉयईफ्रेंडशी लग्न करता यावे यासाठी तिने आपल्या नवऱ्याला सोडून दिलं. परंतु या महिलेला धक्का तेव्हा बसला जेव्हा तिच्या प्रियकराने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी नकार दिला.


त्यानंतर आपली फसवणुक झाल्यामुळे या महिलेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.


ही 30 वर्षीय महिला एका इन्शुरन्स कंपनीत काम करत होती. या महिलेचा सुखी संसार सुरू होता आणि या जोडप्याला 5 वर्षांचा 1 मुलगा आहे. परंतु कामानिमित्त विमा कंपनीत काम करत असताना या महिलेची अभय सुरेश जैस्वाल नावाच्या 28 वर्षीय युवकासोबत ओळख झाली.


कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. ज्यानंतर या दोघांनीही लग्नाचा विचार केला.


परंतु ही महिला विवाहित असल्यामुळे तिने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी आपल्या नवऱ्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला. पण ऐनवेळी प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने महिलेची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


ज्यानंतर आपली फसवणूक प्रकरणी पीडित विवाहितेनं वाठोडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.