नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. मंत्रिपदासाठी नऊ नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्नथानम ही नावं मंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


युपी आणि बिहारमधून प्रत्येकी दोन मंत्री मिळण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. राजीव प्रताप रूडी, कलराज मिश्र, संजीव बलियान, निर्मला सीतारमन, बंडारू दत्तात्रय यांसह काही युपी, बिहार आणि दक्षिणेकडील मंत्र्यानी राजीनामा दिला आहे. यावरून त्यांच्या कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याचे दिसून येते.