नवी दिल्ली : प्रेमासाठी काहीही करणारे कपल्स आपण पाहिले आहेत, अनेक किस्से ऐकले आहेत. पण उत्तर प्रदेशातील बदाऊंमध्ये जे झालं आहे ते फार धक्कादायक आहे. येथे सासऱ्याचा जीव चक्क सूनेवर जडला. एवढंच नाहीतर सासरा सुनेला पळवून घेवून गेला. पळून जाण्यामध्ये सुनेची देखील इच्छा होती. त्यानंतर सासरा आणि सुनेने पळून लग्न केलं आणि काही वर्षानंतर ते दोन वर्षांच्या मुलाल घेवून घरी परतले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमची सहयोगी वेबसाईट इंडिया डॉट कॉमच्या वृत्तानुसा, हे प्रकरण बदाऊंमधील बिसौली कोतवाली भागातील दाबथरा गावाचे आहे. महिलेच्या पहिल्या पतीने पोलिस स्टेशनमध्ये सुने आणि सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर पंचायतही बोलावण्यात आली. पण प्रत्येकाने सासरे आणि सून यांच्या बाजूने निर्णय घेतला.


खरं तर, जेव्हा महिलेचा तिच्या पहिल्या पतीशी विवाह झाला तेव्हा तो अल्पवयीन होता. यानंतर महिलेने त्याला घटस्फोट दिला. महिलेने तिच्या मर्जीने तिच्या सासऱ्यासोबत लग्न केले. आईचा मृत्यू झाल्यामुळे मुलीचं अल्पवयीन मुलासोबत 2016 साली लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर मुलाच्या पत्नीवर सासऱ्याचा जीव जडला. 


एवढंच नाही तर सून देखील सासऱ्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर सासरा आणि सूनेने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूनेसोबत लग्न करणाऱ्या सासऱ्याचं वय 45 वर्ष आहे.