लखनऊ : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये भीषण अपघात झालाय. बस आणि ट्रकच्या धडकेत १४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातात २४ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगरा-लखनऊ महामार्गावर ही दुर्घटना घडलीय. दिल्लीहून बिहारच्या मोतीहारी इथं जात असताना प्रवाशांवर काळानं झडप घातलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरोजाबादचे एसपी सचिंद्र पटेल यांनी सांगितले, 'बुधवारी रात्री १०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. बस आणि ट्रकच्या धडकेत १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी ५ प्रवाशांचा मृत्यू सैफई रूग्णालयात दाखल करताना झाल आहे. तर ५ जण अधीक गंभीर आहेत.' तर अपघाताचं मुळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


या अपघाताची माहिती मिळताच आसपासच्या अनेक पोलीस ठाण्यांमधील पथकं मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमी प्रवाशांना सैफईच्या पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. चालकाला झोप आल्यामुळे त्यांचं बसवरील नियंत्रण सुटलं शिवाय तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.