G20 Summit Share Market: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेअर मार्केटवर परिणाम होत असतो. यामुळे शेअर्सच्या किंमती कमी जास्त होत असतात.  9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. यानिमित्ताने जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थेतील देशांचे नेते भारतात येणार आहेत. या परिषदेत जागतिक आर्थिक आणि आर्थिक परिस्थिती, हवामान बदल, दहशतवाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी ही मोठी संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

G20 शिखर परिषदेचा भारतीय शेअर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात नियमित गुंतवणूक करणारे अनेकजण देशातील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. परिषदेच्या अजेंडाशी संबंधित शेअर्सवर त्यांना जास्त लक्ष ठेवता येणार आहे.


या शेअर्सवर मोठा परिणाम 


G20 शिखर परिषदेचा पुढील समभागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोलियम आणि गॅस हे या चर्चेक महत्वपूर्ण असेल. ऊर्जा सुरक्षेवर परिषदेत चर्चा होणार आहे, त्यामुळे तेल आणि वायू कंपन्यांचे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि इंडियन ऑइलचा समावेश आहे.
 
इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल्स क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान बदलावरही परिषदेत चर्चा होणार असल्याने या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस आणि मारुती सुझकी या शेअर्सकडे लक्ष ठेवता येऊ शकेल.
 
संरक्षण आणि पायाभूत सुविधा हा चर्चेतील अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सुरक्षा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावरही परिषदेत चर्चा होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात. यामध्ये लार्सन अँड टुब्रो, एचएएल आणि टाटा स्टीलच्या शेअर्सवर लक्ष ठेवता येऊ शकेल. 


G20 शिखर परिषदेपासून पुढील शेअर्समध्ये करता येईल गुंतवणूक


रिलायन्स इंडस्ट्रीज - ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून हा  व्यवसाय तेल आणि वायू, किरकोळ आणि दूरसंचार यांसारख्या क्षेत्रात आहे. 


टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असून तिचा व्यवसाय जगभरात आहे. 


इंडियन ऑइल ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू कंपनी आहे. जी 20 नंतर या शेअर्समध्येही हालचाल पाहायला मिळू शकते.


टाटा स्टील ही भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी असून या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. 


शेअर बाजारात कोणतीही हमी नसते, त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही चांगले ठरेल याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्या.