नवी दिल्ली : गोरखपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये 70 लहानग्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला असताना, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केली होती. 


मात्र भारतासारख्या मोठ्या देशात अशी दुर्घटना पहिल्यांदा झालेली नाही. अशा अनेक दुर्घटना घडल्यात, अशा शब्दांत अमित शाहांनी राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली.