नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण करा, अशी मागणी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केंद्र सरकारकडे केली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 जिल्ह्यांमध्ये 114 जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष बाब म्हणून 7 हजार 180 कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य केंद्रानं करावं असंही राज्यपालांनी म्हटलं आहे


नवी दिल्ली इथं झालेल्या राज्यपाल परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. 


या परिषदेमध्ये नव भारत 2022 मधील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास त्याचबरोबर राज्य आणि राजभवनाच्या माध्यमांच्या पुढाकारातून करण्यात आलेले उपक्रम याविषयी चर्चा करण्यात आली.  


रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यातील समन्वयात सुधारणेची गरजही राज्यपालांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने रेल्वे पोलीस दलात आवश्यकतेप्रमाणे संख्याबळ वाढविण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली.