नवी दिल्ली : पाकिस्‍तानकडून सतत गोळीबार होत आहे. भारताला उकसवण्याचं काम पाकिस्तानचं सैन्य करतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्करातील कॅप्‍टन कपिल कुंडूसह चार जवान शहीद झाले आहेत. अजूनही सिमेवर गोळीबार होत आहे. पाकिस्तानच्या या हरकतीवर केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


अहीर यांनी म्हटलं की, आम्ही पाकिस्तानला यासाठी माफ नाही करणार. पाकिस्तानला याचे परिणाम भोगावे लागतील. पाकिस्‍तानच्या या हरकतीला जोरदार उत्तर दिलं जाईल. त्यांना सोडणार नाही.


गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, भारतीय सेना आपल्या जवानांच्या बलिदानाचं उत्तर देतील. आम्हाला सेनेच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे.