मुंबई : सीमेपलिकडून भारतात दाखल होणाऱ्या नकली नोटांचा धंदा फोफावतोय. नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. गृह मंत्रालयाने २०१६ पासून ते २०१९ पर्यंत भारतात आलेल्या नकली नोटांचा आकडा जाहीर केला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे भारतात पाकिस्तान २ हजार, ५०० आणि २०० च्या नकली नोटा पाठवत आहे. या नोटांची भारतातील एन्ट्रीच बंद व्हावी, यासाठीही सध्या प्रयत्न सुरु आहेत. पण, यामध्ये सर्वात गरजेचं आहे ते नागरिकांनी जागरुक राहणं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, २ हजार, ५०० आणि २०० च्या नकली नोटा जप्त करण्याच्या बाबतीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात मधून १२ कोटींपेक्षा जास्त नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम बंगालमधून १० कोटी आणि पंजाबमधून ५० लाख रूपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.


त्यामुळे RBIने नागरिकांना सावधान करत नकली नोटा कशा ओळखाच्या सूचना दिल्या आहेत. 
- बहुतेकदा नोटाच्या कागदावरून नोट खरी आहे की खोटी हे ओळखता येऊ शकेल.
- नोटेवर  देवनागरीमध्ये २००० संख्या लिहिलेली असेल आणि मध्यभागी महात्मा गांधी यांचे चित्र आहे.
- खऱ्या नोटांवर छोट्या लिपीमध्ये भारत आणि इंडिया लिहलेलं असेल.
- नोटेच्या पुढच्या बाजूला असलेल्या धाग्यावर भारत, आरबीआय आणि २००० असे लिहिलेले आहे. 
- खऱ्या नोटेला एका बाजूला वाकवल्यानंतर धाग्याचा हिरवा रंग निळ्या रंगात बदलतो.
- गव्हर्नरच्या स्वाक्षर्‍यासह महात्मा गांधींच्या फोटोच्या उजवीकडे, प्रॉमिस क्लॉज हे रिझर्व्ह बॅंकेचे प्रतीक आहे.