श्रीनगर : पाकिस्तानकडून होत असलेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघनात भारताने देखील त्याला चोख प्रत्त्यूतर दिलं. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे ५ सैनिक मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना भारतात घुसण्यात मदत करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून फायरिंग केली जाते. पाकिस्तान हा असा देश आहे जो कधीच शांत बसत नाही. भारता विरुद्ध त्याच्या कुरापती सुरुच असतात. अनेकदा सीमा भागातील गावांना देखील पाकिस्तानी लष्कराकडून लक्ष्य केलं जातं. आतापर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या या फायरिंगमुळे अनेक जवान शहीद झाले आहेत. तर अनेक नागरिकांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे.


मागील ४८ तासामध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार होत आहे. या दरम्यान पाकिस्तानने काही गावांना टार्गेट केलं. भारतीय जवानांनी पाकिस्तानला यानंतर जोरदार उत्तर दिलं. पाकिस्तानचे ५ जवान यामध्ये ठार झाले आहेत.