बंगळुरू : भारत पाक सिमेवर दररोज पाच-सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले जात असल्याचा दावा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी केला आहे. पाकिस्तानी जर गोळीबार करत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर द्या असे आदेश सैनिकांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. शेजारी देश दहशतवादी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे आणि भारतीय सैनिक प्रत्येक दिवसाला त्यातील पाच ते सहा दहशतवादी ठार करत असल्याचे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानवर स्वत: हून गोळीबार न करता त्यांच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर द्यायचे असे सांगण्यात आले. 'जर तिकडून प्रथम फायरिंग झाली तर असंख्य बुलेट्सनी त्याचे उत्तर देण्यास मी सांगितले आहे.' असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.  यावेळी डोकलामच्या प्रश्नावरही राजनाथ सिंह यांनी भाष्य केले. भारत कमकुवत नसून शेजारी चीनसोबत असलेल्या विवादास्पद मुद्याचे निराकरण करण्याच्या स्थितीत असलेल्या एक मजबूत देश आहे.


 "भारत एक मजबूत देश आहे असून चीनशी सुरू असलेल्या डोकलाम समस्येचे निराकरण कसे केले हे आपल्याला ठाऊक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. " जर भारत दुर्बल देश असता तर ते चीनशी समस्येचे निराकरण करण्यास अपयशी ठरला असता असे अनुमान जगभरातील बहुसंख्य लावत आहेत.