मुंबई: लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात कशी असेल किती सुंदर असेल अशी स्वप्न रंगवणाऱ्या नवरदेवाला 460 चा जोर का झटकाच लागला. जेव्हा लग्नाच्या मंडपात नवऱ्या मुलीनं 6 फेरे पूर्ण झाल्यावर थेट लग्न मोडण्याचा हट्ट धरला. यामागचं कारण ऐकून तर वऱ्हाडी मंडळी कोमात जायची बाकी होती. हिंदू परंपरेनुसार लग्नमंडपात 7 फेरे घेण्याची परंपरा आहे. 6 फेरे घेतल्यानंतर थेट नवऱ्यामुलीनं लग्नाला नकार दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निला साक्षी मानून सुरू असलेल्या सप्तपदीमध्ये नवरीनंच अडळथा आणला. लग्न करायचंच नाही म्हणत सातवा फेरा घेतला नाही आणि वऱ्हाडीही आश्चर्यानं तिच्याकडे पाहातच राहिले. या वेळी नवऱ्यामुलीला मनवण्याचा जमलेल्या सर्वांनीच खूप प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी ठरले. 


वधू-वरांच्या मित्र आणि नातेवाईकांनी वधूला लग्नासाठी खूप समजवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. मात्र नवरीमुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. हे पाहून प्रकरण इतके गंभीर झाले की मध्यरात्री पंचायतीला या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास खास बोलवून घेण्यात आलं. वधूनेही तिथेही तिची बाजू मांडली, त्यामुळे नवरदेवासह नातेवाईकांना परत जाण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नाही.


लग्न न करण्यासाठी तू तयार का नाहीस असा प्रश्न अखेर नवरदेवानं विचारला? तर तिने उत्तर दिले की तिला नवरदेव आवडत नाही. यावर वराच्या वडिलांनी सांगितले की वधू लग्नासाठी तयार नसती तर तिने जयमालसह या लग्नसमारंभात का हजेरी लावली. सूत्रांनी सांगितले की लग्नाच्या इतर सर्व विधी सुरळीत पार पडल्या. लग्नाच्या दिवशीही सकाळपासूनच तणाव किंवा वाद नव्हता. प्रत्येकजण आनंदी होता. हे सर्व अचानक घडले. 


वधू म्हणाली माझी मर्जी म्हणून मला लग्न करायचं नाही. कारण मला नवरदेव आवडत नाही असं सरळ उत्तर देऊन ती मंडपातून चालती झाली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी देखील अगदी छोट्या कारणांमुळे लग्न मोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.