नवी दिल्ली : ज्या महिला आयपीएसमुळे भल्याभल्या गुंडाना घाम फुटायचा तिच महिला अधिकारी आज मोस्ट वॉन्टेड आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालची सीआयडी टीम सध्या माजी सुपरिटेंडेंट आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांचा शोध घेत आहे. भारती घोष या एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सर्वात जवळच्या मानल्या जायच्या. 


आयपीएस होण्यासाठी भारती या एसपी होत्या. सीआयडीचा आरोप आहे की या महिला आयपीएस अधिकाऱ्याने 300 कोटींची जमीन खरेदी केली. सीआयडीकडे याबाबतचे पुरावे देखील आहेत.


भारतीवर कथित रूपात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती देण्याचा आरोप आहे. रिपोर्टनुसार भारती घोष यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. भारती यांचा पती देखील पोलिसांच्या रडारवर आहे. अवैधपणे वसूलीसह अनेक प्रकरणात आरोपी राजूच्या अटकेवर कोलकाता हायकोर्टाने 15 मार्चपर्यंत स्थगिती आणली आहे. यासर्वात घोष यांनी एक ऑडियो जारी करत सीआयडीच्या कारवाईची निंदा केली आहे.


भारती घोष यांनी 29 डिसेंबर 2017 ला राजीनामा दिला. आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी पश्चिम मेदिनीपूरमधून पोलीस अधीक्षक पदावरुन हटवल्याने पोलीस महासंचालकांकडे आपला राजीनामा सोपवला.