श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात सैन्याला यश आले आहे. लितर गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.. यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालून कारवाईला सुरुवात केली. या चकमकीत वसीम शाह आणि हाफिज निसार हे दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे. पुलवामामधील लितर गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. शनिवारी पहाटेपासून ही चकमक सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कर-ए-तय्यबा (एलईटी) दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी ठार मारलेत.
एएनआयच्या मते, पुलवामा येथील लितर गावात ही चकमकी सुरु आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. वासिम शहा आणि हाफिज निसार अशी दोघांनी नावे आहेत.



शाह हे लष्करे तोयबाचे स्थानिक क्षेत्र कमांडर असल्याचे समजते. निसार यांच्यासह त्यांचे सहकारी यांच्यासह सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याची योजना आखत होते. दरम्यान,  सर्च ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या सैन्याला त्यांच्याबद्दल एक टीप मिळाली आणि या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.


लितर गावात अतिरेक्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी सकाळी लवकर ऑपरेशन सुरू केले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांनी गोळीबार करत असताना या दोघांची हत्या करण्यात आली. सुरक्षा दलांनी 1 ए के -47, 1 ए के -56 आणि 6 एके मॅगझीन जप्त केले आहेत.


ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या सर्व सैनिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ११ ऑक्टोबर रोजी बांदीपुरा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन लष्कराने अतिरेकी ठार केले होते. यावेळी दोने भारतीय जवान शहीद झालेत.