जम्मू : जम्मू काश्मीर राज्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना भारतीय लष्कराने कंठस्नान घातले आहे. काश्मिरी पंडित राहुल भटची हत्या करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे. हे तिघे दहशतवादी लष्कर ए तैयबा या संघटनेशी संबधीत होते. या कारवाईत लतीफ रादरही मारला गेला आहे. (Three Terrorists Killed In Jammu Kashmir )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लतीफ रादरने काश्मीर खोऱ्यात अनेक हत्या केल्या आहेत. महसूल विभागात काम करणारे राहुल भट यांची हत्या देखील रादरनेच केली होती. त्यामुळे सुरक्षा दलाची त्याच्या हालचालींवर नजर होती. बुधवारी लतीफ आणि त्याचे सोबती बडगावमध्ये असल्याची माहिती लष्कराला मिळाली. लष्कराने कारवाईचे नियोजन आखले आणि त्यानुसार केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. (Terrorist Killed)


लष्करी कारवाईत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली.