नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. या घोषणापत्रात सेनेचं आधुनिकीकरण, मोफत आरोग्यसेवेचा अधिकार, प्रदूषणाच्या मुद्द्यावरही काँग्रेसनं घोषणा केल्यात. 'Congress Will Deliver' म्हणजेच 'काँग्रेस निभावणार' अशी या काँग्रेसच्या घोषणापत्राची थीम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय राजधानी दिल्ली स्थित काँग्रेसच्या कार्यालय परिसरात हे घोषणापत्र जाहीर करण्यात आलं. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, वरिष्ठ नेते ए के एन्टनी, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, आनंद शर्मा, सुशील कुमार शिंदे, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यासमवेत काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. 


काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जन आवाज घोषणापत्र' असं या जाहीरनाम्याचं नामकरण करण्यात आलंय.  


काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे... 


- घोषणापत्रात 'न्याय' योजनेचाही उल्लेख करण्यात आलाय. काँग्रेसनं आधीच जाहीर केलेल्या 'न्याय' योजनेनुसार समाजातील गरिबांना वार्षिक ७२,००० रुपये देण्याची घोषणा करण्यात आलीय. यासाठी देशातील पाच करोड सर्वात कुटुंबांना मासिक ६००० रुपये दिले जातील.


- काँग्रेसनं दिलेल्या आश्वासनानुसार, पुढच्या सहा महिन्यांत सर्व सरकारी पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. हा आकडा जवळपास २२ लाखांवर आहे


- जीएसटी १२ टक्क्यांवर आणण्यात येईल तसंच जीएसटीचा स्लॅब केवळ एकच असेल. 


- निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तुंवर कोणत्याही प्रकारचा जीएसटी आकारला जाणार नाही. 


- पूर्वेत्तर राज्यांत सिटिझन चार्टर रिव्ह्यू केला जाईल. यासोबतच या राज्यांच्या विकासावर भर दिला जाईला.


- जम्मू - काश्मीरचा विकास ही प्राथमिकता असेल.