मुंबई  : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावं आणि जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.


हेल्पलाईन क्रमांक जारी
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.  या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे. आज सकाळी इंदोर होऊन अमळनेर कडे निघालेली एसटी महामंडळाची बस मध्य प्रदेश मधील खलघाट आणि टिकरी यामधील नदी पुलावर नदीच्या पुलावरून नर्मदा नदीत कोसळण्याची घटना घडली आहे.


आठ जणांची ओळख पटली
एसटी बस दुर्घटनेत13 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 8 जणांची ओळख पटली असून पाच जण महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. 


1. चेतन राम गोपाल जांगिड, नांगल कला गोविंदगढ, जयपुर राजस्थान
2. जगन्नाथ हेमराज जोशी, (वय 70) मल्हारगढ, उदयपुर राजस्थान
3. प्रकाश श्रवण चौधरी (वय 40 )  शारदा कॉलनी अमळनेर, जळगाव महाराष्ट्र
4. नीबाजी आनंदा पाटिल (वय 60 ) पीलोदा, अमळनेर
5.  कमला नीबाजी पाटिल (वय 55) पिलोदा, अमळनेर जलगाव
6. चंद्रकांत एकनाथ पाटील (वय 45) अमळनेर जळगाव
7. अरवा मुर्तजा बोरा (वय 27 ) मूर्तिजापुर, अकोला महाराष्ट्र
8. सैफुद्दीन अब्बास निवासी, नूरानी नगर इंदौर