नवी दिल्ली : राज्यातल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तब्बल चार तास चर्चा झाली. यांत मंत्रीमंडळ यादी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. तसेच शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी कोणती खाते द्यायचे यावरही खलबतं झाली. तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मंत्रीमंडळात येण्यासंदर्भातही चर्चा झाली.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या अखेरच्या वर्षात अधिक महत्त्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला दिली जाऊ शकतात. दसऱ्यानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय.