श्रीनगर : भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५(ए) मध्ये बदल केल्यास काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणारा कुणीही उरणार नाही अशी धमकी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरच्या विशेष अधिकारावरुन त्यांनी ही धमकी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमधील जनतेला मिळालेल्या या विशेष अधिकारांवर घाला घालण्याचं काम केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं मुफ्ती यांनी म्हटलंय. त्यामुळे तिरंग्याचं संरक्षण करणारा आणि तिरंगा फडकावणारा कुणीही उरणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय.