नवी दिल्ली :  केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, राहुल गांधीजी अकलचे पैदल है क्या?  त्यांना हे समजायला हवे की भोळ्या भारतीयांचा डाटा चोरीचे ( फेसबूक डाटा लीक) प्रकरण गंभीर आहे.  यात सामील होणाऱ्यांचा पर्दाफाश होत असेल तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून आरोप केला होता की सरकार डाटा लीकचे प्रकरण समोर आणून सरकार ३९ भारतीयांना इराकमध्ये ठार करण्याची घटनेला दाबण्याचा प्रकार करत आहे. सरकारचं खोटं पकडलं गेले आहे. 


राहुल गांधीने ट्वीट करून म्हटले की, इराकमध्ये ३९ भारतीयांना ठार करण्याच्या घटनेचे निराकरण असे होत की मीडियाने काँग्रेस आणि डाटा चोरीच्या बातम्या बनवायला हव्यात. समस्येचा निकाल हा लागला की मीडियाने ३९ भारतीयांच्या मृत्यूच्या बातमीला रडारवरून गायब करावे. याचे गोष्टीचे निराकरण झाले आहे, असे भासवावे.  


इराकमध्ये २०१४ मध्ये ४० भारतीय बेपत्ता झाले होते. त्यातील ३९ जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले.  डीएनए चाचणीनंतर ही पुष्टी करण्यात आली. 


फेसबूकच्या पाच कोटी युजर्सची माहिती लीक 


सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबूक वादात अडकली आहे. पाच कोटी युजर्सची माहिती लीक झाली आहे. यात फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने यातील चूक मान्य केली आहे. डाटा सुरक्षा करणे आमची जबाबदारी आहे.  हा डाटा केंब्रिज एनालिटीका कंपनी इलेक्श