मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा शो हा भारतातील सगळ्यात जास्त पसंती आणि प्रसिद्धी मिळालेला शो आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत या शोचे चाहते आहेत. या शो मधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो चांगला सुरू असताना, यामध्ये दया बहिणीची भूमिका करणारी दिशा वकनी, नट्टू काकाची भूमिका साकारणारा घनश्याम नायक आणि आता बबिता जीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता यांनी हा शो सोडला आहे. ज्यानंतर आता  शोमध्ये टप्पूची भूमिका साकारणारा राज उनाडकटही काही दिवसांत शोला अलविदा करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे तरी शोवरती होऊ लागला आहे, ज्यामुळे या शोचा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे. शोच्या निर्मात्यांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. यामुळे नुकतेच शोच्या निर्मात्यांनी शोच्या हिताचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्यांनी नवीन कलाकार लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.


या शोमध्ये सगळ्यात सुंदर दिसणारी महिला म्हणून बबिता जीने जागा बनवली होती. ज्यामुळे गोकूळधाम सोसयटीमधील जवळ-जवळ सगळा पुरुष वर्ग तिच्या मागे वेडा असतो. परंतु आता शोचा सुंदर चेहरा गेल्यामुळे शोच्या मेकर्सनी शोमध्ये एका नवीन व्यक्तीची एन्ट्री केली आहे.



ही नवीन तरुणी बबिता जीपेक्षाही सुंदर आहे आणि यासोबतच शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये या नव्या कलाकाराच्या स्टाइलने सर्वांनाच वेड लावले आहे. या नवीन अभिनेत्रीचं नाव अर्षा भारती आहे.


अर्शा भारती शोमध्ये तारक मेहताच्या बॉसच्या सेक्रेटरीची भूमिका साकारत आहे आणि तिच्या येण्यामुळे बबिताजीची कमी शोला जाणवणार नाही अशी मेकर्सला आशा आहे. आता या शोमधील कथा तिच्याभोवतीच फिरत आहे. त्यामुळे लोक या नवीन व्यक्तिरेखेला खूप पसंत करत आहेत आणि शोचा टीआरपीही थोडा वाढला आहे.