बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रचाराचा नारळ फोडला. बंगळुरूमध्ये झालेल्या जाहीर सभेत टोमॅटो, कांदा आणि बटाटा ही तीन पिकं, सरकारच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च स्थानी असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. 


काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच्या शैलीत पंतप्रधानांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केला. शिवाय शेतकऱ्याचा मुलगा असणारे, येडीयुरप्पा कर्नाटकच्या शेतकऱ्यांना खरा न्याय देतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. 


कामांचा पाढा मोदींनी वाचून दाखवला


कर्नाटकमध्ये गेल्या चार वर्षात केलेल्या कामांचा पाढा यावेळी मोदींनी वाचून दाखवला. शिवाय राज्यात भाजपचं सरकार असतं, तर विकासाची कामं आणखी वेगाने झाली असती असंही मोदी म्हणाले.