मुंबई : मोदी सरकारमधील गो गेटर असं लौकीक मिळवलेल्या नितीन गडकरींनी पुढील पाच वर्षांसाठी आपला कामाचा आराखडा तयार केला आहे. रस्ते बांधकामासाठी १५ लाख कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. त्यापैकी २२ हरीत महामार्ग असणार आहेत. तसंच अडकलेले प्रकल्प १०० दिवसांत मार्गी लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. रस्ते विकास आणि लघू आणि मध्यम उद्योग ही दोन खाती गडकरींकडे आहेत. खादी आणि इतर लघू उद्योगांच्या विकासाचीही योजना गडकरींनी आखली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीच्या मोदी सरकारच्या काळात गडकरींनी रस्ते विकास, जलवाहतूक, गंगा स्वच्छता, जलस्त्रोत या चार मंत्रालयांचा कारभार हाकताना तब्बल १७ लाख कोटींची कामं केल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यातली ११ लाख कोटींची कामं निव्वळ रस्ते विकासाची होती असं गडकरींनी सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २२५ प्रकल्प अडकले होते. मात्र त्यांचा निपटारा झाल्याचंही ते म्हणाले. आता केवळ २० ते २५ प्रकल्प रखडले आहेत. हे रखडलेले प्रकल्प येत्या १०० दिवसांत पूर्ण होतील असं त्यांनी म्हटलं आहे.