नवी दिल्ली :  लग्नाचा क्षण हा सर्वांसाठी खूप खास असतो. पण अशात काही अपघात घडला तर आनंदावर विरजण पडते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यूपीतील गोंडा जिल्ह्यातील तरहर गावात लग्नातील एका विधीवेळी गोंधळ झाला.


 



 नवरदेव घोडीवर बसला असताना एका विहिरीची प्रदक्षिणा मारायची होती. असे करत असताना कोणीतरी फटाका लावला. त्यामुळे घोडी घाबरली आणि नवरदेवासह विहिरीत जाऊन पडली. 


या घटनेनंतर लग्नाच्या ठिकाणी खळबळ माजली. घोडी आणि नवरदेवाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन मागविण्यात आले. दोराच्या साहय्याने दोघांना बाहेर काढण्यात आले.