नवी दिल्ली : पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून जोरदार प्रत्यूत्तर दिलं जात आहे. भारतीय सैन्यासाठी पाकिस्तानच्या या अशा हरकती नवीन नाही आहे. पाकिस्तानकडून सतत असा गोळीबार होत असतो. भारतीय जवान त्याला उत्तर देत असतात.


भारतीय सीमा भागातून दहशतवाद्यांना घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तानचं सैन्य अशा प्रकारे गोळीबार करून भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असतात पण भारतीय सैन्य त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देत नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय जवान चांगलाच समाचार घेतात. आतापर्यंत या वर्षात भारतीय सैनिकांनी २०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.