जम्मू काश्मीर :  जम्मू काश्मीर सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा भारतानं बदला घेतलाय़. भारतीय सुरक्षा दलाने आठ पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या ४ दिवसांपासून सीमेवर गोळीबार सुरु आहे. 


पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कठुआ, सांबा, जम्मू, राजौरी आणि पूँछमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरु आहे. याच गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत 8 पाकिस्तानी रेंजर्सचा खात्मा केल्याची माहिती मिळतेय. 



गोळीबारात आतापर्यंत 3 भारतीय जवान शहीद


भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारात आतापर्यंत 3 भारतीय जवान शहीद झालेत तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.