नवी दिल्ली : 'जुमलेबाजी बंद करो', 'क्या हुआ, क्या हुआ, १५ लाख का क्या हुआ' अशा घोषणा देत विरोधकांनी लोकसभा सभागृह दणाणून सोडले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी ही घोषणाबाजी करण्यात येत होती.


काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी विरोधकांनी मोदींच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केली. विरोधकांकडून १५ लाखांचे काय झाले काय झाले, असे विचारले गेले. 


आंध्रप्रदेशला कमी निधी 


याशिवाय तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशला कमी निधी दिल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी केली. यावेळी विरोधकांची लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. मोदीजी जुमलेबाजी बंद करो, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्यात. 


काँग्रेसने देशाचे तुकडे केले


गेल्या ७० वर्षांत फक्त एकाच कुटुंबाचे गुणगान गाण्यात येत असायचे. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर देश पुढे गेला असता. काँग्रेसमुळे देशाचा विकास झाला नाही. घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये. ७० वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागतेय. आधीच्या सरकारने देशाचे तुकडे केले, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.