मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. सीआरपीएफ जवानांना सर्वच स्तरातून श्रद्धांजली दिली जात आहे. शहीद जवानांच्या गावात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं आपल्या भावना व्यक्त करत आहेत. जर तुम्ही देखील वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करु इच्छित असाल तर शेवटी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना शब्दांच्या रुपात तुम्ही मांडू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये ४४ भारतीय जवानांना वीरमरण आलं होतं. जवळपास सीआरपीएफच्या ७८ गाड्या गाड्यांचा ताफा जम्मू येथून श्रीनगरला जात असताना हा हल्ला करण्यात आला. विस्फोटकांनी भरलेली एक गाडी जवानांच्या बसला येऊन धडकली. याचा स्फोट इतका मोठा होता की १० किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू आला.


या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. तुम्ही खूप मोठी चूक केली असून याचा शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करत म्हटलं की, 'विरोधी पक्ष सरकारसोबत आहे. हा आमच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे.'


खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शब्दात वाहा श्रद्धांजली...