मुज्जफरनगर : भारतीय सैन्याला ६ महिने लागतील तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ दिवसात एवढी फौज गोळा करेल असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुज्जफरनगरमध्ये आयोजित ६ दिवसांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


आम्हाला संघ किंवा संघटनेची काळजी नाहीए, देश आणि समाजासाठी आम्ही काहीही करायला  तयार आहोत असेही त्यांनी सांगितले. 


सैन्यापेक्षा कमी नाही 


 आम्ही सैन्य नाही आहोत पण शिस्तीमध्ये आम्ही सैन्यापेक्षाही कमी नाही असे त्यांनी सांगितले.


'संघ संपून जाईल'


भारतात परम वैभव संपन्न हिंदू राष्ट्राची स्थापना झाल्याच्या दिवशीच संघाचे विसर्जन होईल असेही सरसंघचालकांनी यावेळी सांगितले.


त्यानंतर संघ राहणार नाही. सर्व स्वयंसेवक तन-मन-धनाने संपूर्ण भारताला आपले मानतो.