मुंबई : अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला हा देशवासियांवरील हल्ला आहे. दिल्लीतल्या सरकारवर हल्ला आहे. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध करण्याची ही वेळ नसून चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे.


सर्जिकल स्ट्राईक, नोटबंदीमुळे काहीच फरक पडला नसून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करायलाच हवा असं राऊत यांनी म्हटलंय. यावेळी राऊत यांनी 1996 सालच्या अमरनाथ यात्रेची आठवण सांगितली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळे अमरनाथ यात्रा पार पडली होती असं संजय राऊत म्हणाले.