छतरपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणलाय. राम मंदिर निर्माण करण ही आमची इच्छाच नव्हे तर संकल्प असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.


तयार रहावे लागेल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मध्ये प्रदेशातील छतरपुर जिल्ह्यातील मऊसहानियामध्ये महाराजा छत्रसाल यांच्या ५२ फुट उंच प्रतिमेचे अनावरण मोहन भागवत यांच्याहस्ते करण्यात आले.



त्यावेळी भागवत बोलत होते. राम मंदिर बनविणाऱ्यांना काही ना काही करावेच लागेल.


राम मंदिर कधी बनणार हा मूळ प्रश्न नाही तर त्यानिमित्त आपल्याला तयार रहावे लागणार हे महत्त्वाचे असल्याचे भागवत यांनी सांगितले. 


वर्तमानकाळ हाच योग्य 


वर्तमानकाळ हाच राम मंदिर बनविण्यास योग्य काळ असल्याचे सांगत राम मंदिर बनविणाऱ्यांना रामासारखेच व्हावे लागेल तरच कार्य शक्य असल्याचे ते म्हणाले.