त्रिपुरा निवडणूकीत पहिल्यांदा लेफ्टच्या दुर्गला पराजय देऊन भाजपने आरएसएसच्या एका मोठ्या मिशनला पूर्ण केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर सगळीकडे भाजपची जोरदार चर्चा आहे. असं पहिल्यांदा झालं आहे की कोणत्या विधानसभा निवडणुकीत या अगोदर फक्त 1.5 टक्के मतदान मिळाले आहे. आणि त्यानंतर उंच झेप घेत 42 टक्के मतदान मिळून सरळ सत्तेत आले आहेत. 


कोण आहे ही महत्वाची व्यक्ती? 


भाजपच्या या विजयासाठी एका व्यक्तीला महत्वाच ठरवलं जात आहे. हा विजय त्याव्यक्तीमुळे शक्य झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे. आणि दुसरं तिसरं कुणी नसून ही व्यक्ती आहे अमित शहा. 


काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 


मोदींनी अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वाचं भरभरून कौतुक केलं. यामुळेच एका पाठोपाठ एक विजय मिळवणं आपल्याला शक्य झालं असं देखील ते म्हणाले. अमित शहा सगळ्यांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत आहेत. आणि ते पूर्ण करणं प्रत्येकाचं काम आहे.