UP Crime : एका आईने प्रियकर आणि दिरासोबत मिळून स्वतःच्याच आठ वर्षाच्या निष्पाप चिमुरडीच्याची हत्या केली आहे. आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्याची चूक केल्याने मुलाला एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे. पोलिसांनी (UP Police) याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबासह संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या (UP) नोएडाच्या बदलपूरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूरी नावाच्या महिलेने तिच्या 8 वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घरापासून 150 किमी दूर फेकून दिला होता. मृत मुलाने आईला शेजारच्या ओमपालसोबत लैगिंक संबंध ठेवताना पाहिलं होतं. मुलगा कुठे तरी सांगेल याची भूरीला भीती होती. बदनामीच्या भीतीने भूरीने मुलाची हत्या केली. या हत्येनंतर पोलिसांनी माणक, अमर सिंगसह आई भुरी आणि प्रियकर ओमपाल यांना अटक केली आहे. मृत मुलगा 2 जुलै रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर 7 जुलै रोजी त्याचा मृतदेह संबल जिल्ह्यात आढळून आला होता. पोलीस तपासादरम्यान मृत मुलाची आई भुरी हिचे शेजारचा भाडेकरू ओमपालसोबत अवैध संबंध असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता आईनेच मुलाची हत्या केल्याचे समोर आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण सिंह नावाच्या व्यक्तीचा मुलगा 2 जुलै रोजी अचानक बेपत्ता झाला होता. अनेक दिवस शोध घेऊनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती न मिळाल्याने कल्याण सिंह यांनी 5 जुलै रोजी बदलपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर 7 जुलै रोजी संबळ येथे मुलाचा मृतदेह आढळून माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी मुलाची आई भुरी हिची कडक चौकशी केली. 


रस्त्याच्या कडेला फेकून दिला मृतदेह


भुरीने सांगितले की, मुलगा मला भेटण्यासाठी संबळला आला होता. त्यावेळी त्याने मला प्रियकर ओमपालसोबत अवैध संबंध ठेवताना पाहिले होते. मुलगा त्याच्या वडिलांना सगळं सांगेल याची भीती मला आणि ओमपालला वाटत होती, म्हणून आम्ही त्याला संपवण्याचा कट रचला. त्यानंतर भुरीने तिचा प्रियकर ओमपाल, दीर माणक आणि आणखी एक नातेवाईक अमरसिंग यांनी मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. भूरीने आधी तिच्या दिराला मुलाची हत्या करायला सांगितले होते. पण त्याने तसे करण्यास नकार दिल्याने भूरीने प्रियकरासोबत मिळून मुलाची हत्या केली.


मुलाला पाजले विष


भुरीने मुलाला औषध सांगून विष पाजले होते. प्रकृती बिघडल्याने आरोपींनी त्याला जंगलात नेले आणि तिथे त्याचा गळा दाबून खून केला. काही दिवसांपूर्वी मुलाने भुरीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. त्याने ओमपालच्या घराची तोडफोड देखील केली होती. मात्र आपलं सत्य लपवण्यासाठी भुरीने मुलालाच संपवून टाकलं.