नवी दिल्ली : भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान असून संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष देण्यात आलं असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत खासदार आणि आमदारांचं 2 दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यानिमित्त दिल्लीतल्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांना संबोधित केलं. वुई फॉर डेव्हलपमेंट या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी मोदी बोलत होते.


घराघरात वीज पोहचवणे, जे जिल्हे आणि गावं मागास राहिले त्यांचा विकास करणं हे आपलं कर्तव्य असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.