मुंबई : अनेकदा कुटुंबाच्या दबावाखाली अनेक मुली लग्नाला तयार होतात. आई-वडिलांच्या आनंदाकरता मुलीदेखील आपलं मन मारून लग्नाला तयार होतात. मात्र त्या स्वतःच्याच आयुष्याशी तडजोड करत असतात. जेव्हा लग्न हे दोघांच्या आनंदाने होतं तेव्हा त्या लग्नातला आनंद काही औरच असतो. स्टेजवर दोघं आनंदात दिसत असतात. मात्र जेव्हा लग्न हे नापसंतीने होतं तेव्हा तो आनंद नसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


व्हिडीओ शेअर करून विचारले गंभीर प्रश्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर गीत नावाच्या ऑफिशिअल अकाऊंटमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामधला व्हिडीओ तुम्हाला बैचेन करेल. प्रत्येक मुलीसाठी आपलं लग्न ही मोठी गोष्ट असते. ती अतिशय आनंदात असते. मात्र हेच लग्न जेव्हा मनाविरूद्ध होतं तेव्हा... 


या मुलीचं लग्न तिच्या मनाविरूद्ध होत आहे. काही पालक लव्ह मॅरेजला इतका विरोध का करतात? आपल्या मुलांच्या मनात काय आहे? हे देखील पालक समजू घेत नाही. फक्त लव्ह मॅरेजला विरोध करायचा म्हणून करतात. पण जेव्हा हीच नववधु आरशासमोर व्यक्त होते तेव्हा. ती आपल्या मनातील भावना व्यक्त करते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Geet (@theofficialgeet)


तरूणीचा जबरदस्ती विवाह? गीत आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते की, इतकं सोपं नसतं पुढे जाऊन कुणा दुसऱ्यावर प्रेम करणं. अशामुळे आतापर्यंत किती आयुष्य बर्बाद झाले याची काहीच माहिती नाही. आपला समाज जात, धर्म, सोशल स्टेटस लेबल्स सारख्या गोष्टी बाजूला सारत नाही.