Iron Kadhai Health Risk News In Marathi : जेवण बनवताना आपल्याकडून अनेक चुका होतात. मात्र  जेवण बनवताना  केलेल्या काही चुका तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरु शकतात. या चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम  होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ कढईत करु नये... 


टोमॅटो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक भारतीय पदार्थात टोमॅटो हा मुख्य घटक असतो. भाजी करताना किंवा वाटण तयार करण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. पण मुळात टोमॅटो हा नैसर्गिकरित्या आम्लयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन धान्यामध्ये धातू गळती होऊ शकते. यामुळे, जेवनातील तुमची चव खराब होईल. 


अंडी


अंड्यामध्ये असलेले स्लफरची कढईच्या लोहसोबत प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे अंड राखाडी होऊ शकते आणि चव बदलू शकते. एवढचं नाही तर लोह आणि सल्फरची प्रक्रिया झाल्यास लोखंडी कढईला गंज लागू शकतो. तसेच तिचा रंग उतरु शकतो आणि ती दिर्घकाळापर्यंत टीकू शकणार नाही. त्यामुळे अंड्याचे पदार्थ तयार करण्यासाठी तुम्ही नॉन-स्टिक भांडी वापरावीत.


 मासे


माशांमध्ये अॅसिड असते ज्याची लोहासोबत प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे कढईच्या तळाशी चिकडू शकते.  यामुळे माशांचे चव पूर्णपणे बदलू शकते. जर तुम्ही मासे बनवण्याच विचार करत असाल तर तुम्ही स्टेनलेस स्टील किंवा नॉन स्टीक पॅन सारखे प्रक्रिया न होणारी भांडी वापरा.


भात


तांदळातील उच्च आंबटपणा, ज्याची लोहावर प्रतिक्रिया होऊ शकतो, ज्यामुळे भाताचे रंग बदलतो आणि त्याला पूर्ण धातूची चव येते. लोह तांदळात असलेल्या नैसर्गिक तेलांवर देखील प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे ते पॅनच्या तळाशी चिकटते. म्हणून, भात शिजवताना लोखंडी कढई वापरणे टाळणे आणि स्टेनलेस स्टील किंवा इतर नॉन-स्टिक कुकवेअरने तयार केलेले जड-तळाचे भांडे निवडणे चांगले.


पास्ता


जेव्हा तुम्ही तो टोमॅटोचा सॉस घालून पास्ता तयार करू शकता. कारण टोमॅटोमध्ये आम्लयूक्त घटकांची लोहासोबत प्रक्रिया होऊ शकते जे चांगले नाही. तसेच लोखंडी कढी जास्त काळ उष्णता पकडून ठेवते ज्यामुळे पास्त जास्त शिजवला जाऊ शकतो किंवा तळाला चिकटू शकतो. 


पालक 


पालकमध्ये ऑक्सालिक ॲसिड असल्याने पालक असलेला पदार्थ लोखंडाच्या कढईत केल्याने पालकाचा मूळ रंग बदलतो आणि हिरव्याऐवजी काळा रंग त्याला प्राप्त होतो. पालकमधील ऑक्सालिक ॲसिड आणि आयर्न या दोन्हीच्या रिॲक्शनमुळे पालकाचा रंग बदलतो.


लिंबू 


लिंबूदेखील ॲसिडिक आहे. जेव्हा लिंबाचा रस लोखंडाच्या कढईत तयार होत असलेल्या भाजीत टाकला जातो, तेव्हा भाजीची चव कडू होते. त्यामुळे लोखंडाच्या कढईत लिंबाचा वापर होणारा पदार्थ बनवू नये.